तुमच्याकडे
आता मी काही मागणार नाही
भुकेचाच
माझ्या मला कैफ आहे
ज्यांनी
नाकारले माणूसपण माझे
त्या
बेगडी उत्सवांशी माझे वैर आहे
नकारविकारांची
आहेत आभूषणे माझी
वाळवंटातूनच
आता माझी नित्य सैर आहे
दुष्काळच
झाला जेव्हा सखा माझा
पावसाची
आठवणसुद्धा आता गैर आहे
फुलांचे
मोसम इथे कधी आलेच नाहीत
माझ्या
उत्सवाच्या दिवसांनाही काट्यांची सवय आहे
आता
हसण्याची चिंता करू कशाला मी
आसवांनीच
जेव्हा मला दिले अभय आहे
कण
आनंदाचे मागता मागता
मी
आता पुरता थकलो आहे
देतो
सुखाला निरोप मी
दु:खांच्या
देशात विसावलो आहे...
No comments:
Post a Comment