Showing posts with label अक्षरमानव. Show all posts
Showing posts with label अक्षरमानव. Show all posts

Saturday, July 13, 2019

पाणी घातल्या झाडांची पानगळ

अक्षरमानव प्रकाशन पुणे यांच्याकडून माझा 'पाणी घातल्या झाडांची पानगळ' हा कवितासंग्रह नुकताच प्रकाशित झाला. PANI GHATLYA ZADANCHI PANGAL
त्याचे हे मुखपृष्ठ.
AKSHARMANAV PRAKASHAN PUNE

Wednesday, November 29, 2017

दोघांती


मी बोललो तुझ्याशी जरी नाही, तुझ्याशीच मी बोलत होतो
रिमझिम तुझ्या आठवांची ती , मी बरसात झेलत होतो

माझ्या एकांताच्या मैफिलीत, नव्हतीस जरी सोबत तू
एकटाच चंद्र तो नभातला परी, मी दोघांती पहात होतो

नव्हतीस तू माझी अन, मीही नव्हतो तुझा कधी
तुझ्यासोबतच परंतु ते सारे, मी बहर झेलत होतो

निरोपाची होती तुला घाई, भेटलीस मावळत्या सूर्यासारखी
तरी चांदण्यात तुझ्या पौर्णिमेच्या मी अखंड नहात होतो

धुक्यात भेटलीस तू  अन, आणखी गर्द होत गेलीस
अदृश्य तू होताना मी तुला माझ्यात लपवत होतो

                      -----  गणेश गोडसे  -----
                 abhijatjavita.blogspot.in

Monday, February 27, 2017

चांदण्या



पूर्वी,
तू हसायचीस तेव्हा,
चांदण्या कशा रांगेत उभ्या रहायच्या,
कवायतीला उभं राहणाऱ्या शाळकरी मुलांसारख्या.

पण आज,
तू हसलीस तेव्हा ,
चांदण्या उधळल्यासारख्या वाटल्या,
मैदान कवेत घेणाऱ्या शाळकरी मुलांसारख्या...


                                    ---गणेश गोडसे---

Monday, February 20, 2017

रात्र रंग

*रात्ररंग*

रात्र -  रंग
नाद काळोखात
उशाचा दिवा
चिंब मन-वात

रात्र जागी
उभा साज
मुके अवकाश
कोरे आवाज

मंद स्पंदनात
हरवलं स्वत्व
मंतरलं विश्व
शून्य अस्तित्व

रात्र न्हाते
तुझ्या उन्हात
उशाचा दिवा
चिंब मन-वात

              *गणेश गोडसे*
  पूर्वप्रसिद्धी - किर्लोस्कर फेब्रुवारी 1999

Featured post

तुला घरच नाही